आमच्याविषयी
हिंदू वीरशैव लिंगायत मंच' या नावाने आपण महाराष्ट्रात संघटन करतो. समाजबांधवांना एका सूत्रात बांधून समाजोन्नतीचा आणि राष्ट्रोन्नतीचा विचार करताना समाजविघातक शक्तींचा जोरकसपणे विरोध करणे हे आपल्या मंचाचे काम आहे. हे एक व्यापक व्यासपीठ असून या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आहे. जे जे समाजहिताचे आहे, त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे. या मंचावर विचारांचे आदानप्रदान, संवाद अपेक्षित आहे.
अधिक माहितीसाठीहिंदू वीरशैव लिंगायत मंच
भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केला असता आपल्या भारतामध्ये अनेक धर्म पाहावयास मिळतात. त्यापैकीच एक हिंदू आहे. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार हिंदू संस्कृती आहे. परंतु 'धारयति इति धर्मः' याप्रमाणे विचार केला, तर भारतीय जनमानसामध्ये रुजलेला एक प्राचीन असा धर्म म्हणजे हिंदू होय. हिंदू हा शब्द सिंधू या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. विद्वानांचे म्हणणे खरे असेल, तर सिंधू खोऱ्यातील सर्व हिंदू ठरतील. आणि यामुळे एका अर्थाने सर्व वीरशैव लिंगायतदेखील हिंदू ठरतील.
धर्माचा अर्थ लावत असताना आचारपद्धतीला खूप महत्त्व असते. हिंदू आचारपद्धतीनुसार वर्ण, आश्रम, सोळा संस्कार इत्यादींना महत्त्व आहे. यापैकी वर्ण आणि आश्रम हे केवळ हिंदू धर्माला अनुसरून आहेत असे म्हणता येत नाही, कारण वर्णाश्रम ही मानवी जीवनाची व्यवस्था लावण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये आहेत वीरशैव लिंगायत परंपरेतदेखील कर्माचे विभाजन पाहावयास मिळते आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास इत्यादीचे महत्व नाकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी